Saturday, October 4, 2014

स्वप्न ५०

स्वप्न ५०

ती चिडूनच म्हणाली,
"काय रे तू तर वचन दिल होतस की
आयुष्यभर सगळी 
स्वप्ने जपून ठेवशील
म्हणून..
आज
सकाळी ती 
सगळी माझ्याकडे परत आली
आहेत रडत रडत.....
मोडलस ना शेवटी वचन...
"
तिला काय सांगु 
काहीच कळेना...
मी अगदी 
एकेक स्वप्न
जपून ठेवल होत
जीवापाड प्रेम केल
या स्वप्नांवर..
पण खरच 
काल 
मलाच कळल नाही
कधी 
मला 
झोप लागली..
..
..
.
.
कायमची

-अजय

No comments:

Post a Comment