Saturday, October 4, 2014

स्वप्न ४०

स्वप्न ४०

तू लिहिलेल
शेवटच पत्र,
या स्वप्नांपासून लपवून 
ठेवल होत मी....
खूप हळवी आहेत...
नसतं सहन 
झाल त्यांना..
..
..
त्यानंतरसुध्दा मग
ही स्वप्ने
रोज यायची नव-नवीन 
खजिना घेऊन...
..
मीही 
पहात बसयचो 
फ़क्त.....
..
पण आज 
कस कोण जाणे
ते पत्र 
या स्वप्नांच्या 
हाती लागलं..
..
..
मला काय बोलू 
सुचत नव्हत..
पण ही स्वप्नेच 
जवळ येत 
म्हणाली-
..
..
..
"तुलाही माहीत 
होतच तर सगळ..."

-अजय

No comments:

Post a Comment