तुझ्याविषयी बोलताना चांदण्यासुध्दा
माझ्याबरोबर रमून जातात...
पुरतील एवढी तुझी स्वप्नं
माझ्याकडून घेऊन जातात..
तुझी प्रत्येक गोष्ट मग
आम्ही दोघं आठवत बसतो
विसरलच काही तर ते सांगायला
वाराही झुळूक बनून येतो
आमच्या अशा गप्पांमध्ये तेव्हा
रात्रही थंडीत जागत राहते
पहाटसुध्दा मग पहाटे पहाटेच
दाट धुक्यांवर निजून जाते...
:)....
ReplyDeletewah..